शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचा फोन नॉटरिचेबल लागल्याने राज्यामध्ये खळबळ झाली आहे. विधानपरिषदेतील निवडणुकीत महाविकास आघाडीला भाजप कडून धक्का दिला, त्यानंतर एकनाथ शिंदे अचानक गायब झाल्याने अनेक चर्चा होत आहेत. निवडणुकीत भाजपाचे पाच उमेदवार विजयी झाले असून काँग्रेस आणि शिवसेनेची मत फुटली. त्यात एकनाथ शिंदेंना संपर्क होत नसल्याने ते बंड पुकारत आहे अशी शक्यता दर्शवली जात होती.
एकनाथ शिंदे सध्या सुरतमध्ये असून त्याच्यासोबत जवळपास २५ आमदारांची हजेरी असल्याची बातमी मिळत आहे. एकनाथ शिंदेंसोबत तानाजी सावंत,ज्ञानराज चौघुले,संजय राठोड,अपक्ष आमदार जयस्वाल (रामटेक), शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण), यवतमाळचे पालकमंत्री भुमरे,भरत गोगावले (महाड),विश्वनाथ भोईर(कल्याण पश्चिम),बालाजी किणीकर(अंबरनाथ),महेंद्र दळवी(अलिबाग), महेंद्र थोरवे(कर्जत), प्रताप सरनाईक,अनिल बाबर(खानापूर), सांगोल्याचे शहाजीबापू पाटील, सुहास कांदे ( नांदगाव- यांचा देखील फोन बंद), दादा भुसे,संजय शिंदे,प्रकाश आबिटकर (कोल्हापूर) हे असल्याची दाट शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंसोबत काही इतर आमदारांचे देखील शिवसेनेच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर आली आहे. याच घडामोडीनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व शिवसेना आमदारांची दुपारी १२ वाजता मातोश्री वर बैठक सुरु आहे.