29 C
Mumbai
Friday, May 5, 2023
HomeकरीअरAdmission Open : ११वी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, 'या' जिल्ह्यांमध्ये होणार ऑफलाईन प्रवेश...

Admission Open : ११वी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया…

महिन्याभरापूर्वी दहावीचा निकाल (SSC Result) लागला आणि आता अकरावीच्या प्रवेशाची (11th Admission Process) प्रक्रिया सर्वत्र सुरु झाली आहे. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना २ टप्पे पार करावे लागतात. त्यातील प्रक्रियेचा पहिला टप्पा पार झाला असून दुसरा टप्पा ज्यांचे निकाल लागले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आला आहे. अकरावीच्या ऑफलाईन (Offline) प्रवेशाला सुरवात करण्यात आली आहे. याकरिता विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमध्ये (College) जाऊन २३ जुलै पर्यंत प्रवेश अर्ज करता येणार आहे. मुंबई महानगर विकास क्षेत्राबाहेरील अकरावीच्या ऑफलाइन (11th Std Offline Admission Process) प्रवेशाला सुरुवात करण्यात आली आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ऑफलाईन प्रवेशाचे वेळापत्रक (Timetable) जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेअनुसार २५ आणि २६ जुलैला निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाणार आहे.

  • ऑफलाइन प्रवेशाचे वेळापत्रक पुढील प्रमाणे –
  • २३ जुलैपर्यंत प्रवेश अर्जाचे वितरण व संकलन करण्यात येईल.
  • २५ व २६ जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार निवड यादी, प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल.
  • २७ ते ३० जुलै निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया.
  • १ व २ ऑगस्ट रोजी जागा शिल्लक असल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यात येतील.
  • ३ व ४ ऑगस्टला दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पार पडेल.
  • ऑफलाईन प्रवेश कुठे होणार?
  • रायगड जिल्हा- पोलादपूर, महाड, तळा, खालापूर, खोपोली, श्रीवर्धन, माणगाव, सुधागड, रोहा, कर्जत, मुरूड, अलिबाग, पेण, उरण, म्हसळा.
  • ठाणे जिल्हा – मुरबाड, शहापूर, अंबरनाथ ग्रामीण, कल्याण ग्रामीण.
  • पालघर जिल्हा – पालघर, डहाणू, जव्हार, वाडा, मोखाडा, तलासरी, विक्रमगड.

कॉलेजनी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार तसेच प्रचलित आरक्षण धोरणानुसार प्रवेश द्यावेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा आरक्षित ठेवाव्यात, त्याचबरोबर अनुदानित तुकड्यांतील कमाल विद्यार्थी क्षमता पूर्ण झाल्यानंतरच क्रमाने विनाअनुदानित तुकड्यांमधील प्रवेश पूर्ण करावेत, अशा सूचना शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या भौतिक प्रमाण लक्षात घेऊनच प्रवेश देणे कॉलेजना बंधनकारक असून शाळांमध्ये भौतिक व अन्य सुविधा ५० विद्यार्थ्यांची असल्यास ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नयेत, असेही कॉलेजना सांगण्यात आले. कॉलेजमधील भौतिक सुविधा, बैठक व्यवस्था व प्रवेश क्षमता तपासण्याची कार्यवाही शिक्षणाधिकारी स्तरावर सुरू आहे. या तपासणीमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध नसताना विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असे आढळून आले तर त्याची जबाबदारी प्राचार्य, शाळा व्यवस्थापनाची असेल.

ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेची एकत्रित माहिती १० ऑगस्टपर्यंत गुणवत्ता यादीसहित सादर करण्याच्या सूचना, त्याचबरोबर आलेल्या सर्व अर्जांची एकत्रित गुणवत्ता यादी, पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीनुसार झालेले प्रवेश, प्रवर्गनिहाय रिक्त जागांची माहिती सादर करायची आहे. शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी प्राचार्यांना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »