29 C
Mumbai
Thursday, May 4, 2023
Homeताजी बातमी लॉक अप चा विजेता: जुनागड चा फारुकी नक्की आहे तरी कोण?

लॉक अप चा विजेता: जुनागड चा फारुकी नक्की आहे तरी कोण?

स्टँड-अप कॉमेडिअन मुन्नवर फारूकी (Munawar faruqui) ‘लॉकअप’ (LockUp) या रिॲलिटी शो चे पहिले विजेते ठरले आहेत. अभिनेत्री कंगना राणावतच्या (Kangana Ranaut) या कार्यक्रमात मुनव्वर हे सुरुवातीपासूनच आव्हानात्मक स्पर्धक मानले जात होते.

शनिवारी (7 मे) रात्री या कार्यक्रमाचा Grand finale पार पडला. यावेळी कंगना राणावतने विजेत्याच्या नावाची घोषणा केली. मुन्नवरसह अंजली अरोरा, पायल रोहतगी, शिवम हे तीन स्पर्धक शेवटच्या फेरीपर्यंत पोहचले.

मुन्नवर फारूकी यांचा ‘लॉकअप’ हा रिॲलिटी शो जिंकण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. 1 जानेवारी 2021 रोजी जेव्हा संपूर्ण जगभरात लोक नवीन 2022 मध्ये मुन्नवर फारूकी पुन्हा एकदा तुरुंगात कैद झाले. पण यावेळचं लॉकअप थोडं वेगळं होतं. त्यांनी कंगणा राणावत होस्ट असलेल्या लॉकअप या रिअलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला.वर्षाचं स्वागत करत होते तेव्हा लोकांना हसवणाऱ्या या गुजराती कॉमेडिअनला तुरुंगात पाठवलं जात होतं. नंतर साधारण महिन्याभरात त्यांची तुरुंगातून सुटका झाली.

‘लॉकअप’ नावाच्या या शोमध्ये 16 स्पर्धक होते. त्या सर्वांना 72 दिवसांसाठी एका ठिकाणी बंद ठेवण्यात आलं होतं. त्यांना मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करत म्हणजेच जवळपास प्रत्येक पायरीवर त्यांना काही टास्क करावे लागतील असं या कार्यक्रमाचं स्वरुप होतं.

कंगना या शोमध्ये जेलरच्या भूमिकेत होती आणि ती 16 कैद्यांकडून टास्क करून घेताना दिसली. ‘टीव्ही क्वीन’ म्हणून ओळख असलेली प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक एकता कपूरनं हा शो तयार केला आहे. प्रेक्षक त्यांच्या आवडीच्या स्पर्धकाला वोट करू शकतील.

जुनागड आणि डोंगरीमधला कलाकार
28 वर्षांचा मुनव्वर फारुकी मूळचा गुजरातच्या जुनागडचा आहे, पण तिथून तो वडिलांसोबत मुंबईत डोंगरी परिसरात राहायला आला. आधी छोटी-मोठी कामं केल्यावर मुनव्वरनं काही काळ ग्राफिक्स डिझायनिंगही केलं, पण 2019 मध्ये तो स्टँड अप कॉमेडीकडे वळला. या क्षेत्रात तसा नवखाच असूनही मुनव्वरला गेल्या वर्षभरात लोकप्रियता मिळू लागली. यूट्यूबवर आता त्याचे पाच लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स (Subscriber) झाले आहेत आणि लाखो लोक त्याचे व्हीडिओ पाहतात. डोंगरीवरचे त्याचे जोक्स तर सोशल मीडियावर (Social Media) गाजले. पण त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकावरवर टिप्पणी करणारे त्याचे व्हीडिओजही व्हायरल झाले आहेत. कुणाला ते पसंत पडले, तर कुणी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करतं.

‘ते’ वादग्रस्त प्रकरण नेमकं काय आहे?

मुनव्वरनं केलेल्या काही जोक्सना आक्षेप घेत गेल्यावर्षी 19 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश पोलिसांतही (Uttar Pradesh Police) त्याच्यावर तक्रार दाखल करण्यात आली होती. मध्य प्रदेश पोलिसांनी मुनव्वरला अटक केल्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनीही त्याची कस्टडी मागितली होती.

1 जानेवारी रोजी मुनव्वर इंदूरच्या छप्पन दुकान परिसरातील मन्रो कॅफेमध्ये कार्यक्रम सादर करण्यासाठी गेला होता. तेव्हा भाजपच्या स्थानिक आमदार मालिनी गौर यांचे पुत्र एकलव्य गौर तिथे आले. त्यांनी स्टेजवर चढून मुनव्वरला जाब विचारला. एकलव्य गौर स्वतःला हिंदूरक्षक संघटनेचे नेते म्हणवतात. त्यांचा दावा आहे की मुनव्वर यांनी या शोमध्ये हिंदू देवी देवतांचा अपमान केला.
इंदूरमधल्या स्थानिक माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत गौर म्हणतात, “तो एक ‘सीरियल ऑफेंडर’ आहे आणि हिंदू देवी-देवतांवर जोक्स करतो. मला मुनव्वरच्या शो-विषयी कळलं तेव्हा मी तिकीट काढलं आणि पाहायला गेलो. अपेक्षेप्रमाणेच तो हिंदू देवतांचा अपमान करत होता आणि गृहमंत्री अमित शहांचं नाव गोध्रा दंगलीशी जोडत खिल्ली उडवत होता.” पण त्यादिशी प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या अनेकांचा दावा आहे, की गौर स्टेजवर गेले तेव्हा मुनव्वरने आपला शो सुरूही केला नव्हता. तो नुकताच स्टेजवर चढला होता.

या घटनेचे काही व्हीडिओज व्हायरल झाले , ज्यात फारुकी गौर आणि त्यांच्या साथीदारांना समजावताना दिसतो. तो गौर यांना आपला हिंदू धर्माचा अपमान करण्याचा उद्देश नसल्याचं तसंच आपल्या जुन्या व्हीडिओंमध्ये इस्लामवरही जोक्स केले असल्याचं तो सांगताना दिसतो. तर काही प्रेक्षकही वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं.
मुनव्वरनं त्यानंतर शो सुरू केला, काही मिनिटांतच गौर यांचे साथीदार परतले आणि त्यांनी मुनव्वरला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

मुनव्वरचे वकील अंशुमन श्रीवास्तव सांगतात, “त्यानं न केलेल्या जोक्ससाठी त्याला अटक झाली आहे. मुनव्वरचा शो सुरु होण्याआधीच त्यांनी अडथळा आणला. एखादा कथित गुन्हा होईल असं अनुमान किंवा अपेक्षा म्हणजे गुन्हा नाही. पोलिसांनी सगळ्या गोष्टी न तपासता त्याच्यावर केस दाखल केली आणि त्याला अटक केलं.” कॉमेडियन मुनव्वर फारूकीला इंदोर पोलिसांनी 1 फेब्रुवारीला अटक केली होती. मुनव्वरसोबत चार लोकांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती.

मुनव्वर आणि इतरांवर हिंदू देवी-देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप होता. मुनव्वर फारूकी इंदोरच्या मुनरो कॅफेमध्ये कार्यक्रमासाठी आले होते. त्याचदरम्यान हिंदू रक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला.

स्टॅन्डअप कॉमेडियन मुनव्वर फारूकीची इंदोर जेलमधून सुटका करण्यात आली आहे.

मुनव्वर फारूकी यांच्या वकिलांच्या टीममधील केशवम चौधरी यांनी बीबीसीशी (BBC) बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “अथक परिश्रमांनंतर मुनव्वर फारुकी यांची सुटका झाल्याचं” त्यांनी पुढे सांगितलं. मुनव्वर फारूकी यांना शनिवारी रात्री उशिरा इंदोर जेलमधून सोडण्यात आलं. फारूकी याचे कुटुंबीय आणि वकील इंदोर जेलच्या बाहेर त्यांची सुटका होण्याची वाट पहात होते. मुनव्वर फारूकी यांचे वकील केशवम चौधरी म्हणाले, “मुनव्वर फारूकीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला. त्याचसोबत त्यांच्या प्रॉडक्शन वॉरंटवर स्टे देण्यात आलाय. तरी देखील जेल प्रशासनाकडून अलाहाबाद कोर्टाच्या आदेशाची मागणी करण्यात आली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश स्पष्ट असल्याचं प्रशासनाला लक्षात आलं.” त्यानंतर फारूकी यांना अटक करण्यात आली. अटक केल्यापासून फारूकी जेलमध्ये होते. त्यांनी अनेकवेळा जामीनासाठी याचिका दाखल केली होती. मध्यप्रदेश हायकोर्टच्या इंदोर खंडपीठाने “अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे” असं म्हणत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

पोलिसांचं म्हणणं काय आहे?
मुनव्वरला पोलीस तुकोगंज पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्याशिवाय 3 जानेवारीपर्यंत इंदूर पोलिसांनी शोच्या आयोजनातील आणखी पाच जणांना अटक केली. त्यात एडविन अँथनी आणि सदाकत खान यांच्यासह नलिन यादव आणि प्रखर व्यास हे दोन कॉमेडियन्स, प्रथमचा भाऊ प्रियम व्यास यांचा समावेश आहे.

फारुकीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर भारतीय दंडविधानाच्या कलम 295 A आणि 298 धार्मिक भावना दुखावल्याचा आणि जाणूनबुजून दुखावणारे शब्द उच्चारल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तसंच कलम 269 अंतर्गत त्याच्यावर बेपर्वा वागणुकीनं संसर्गजन्य आजाराच्या प्रसाराची शक्यता वाढवल्याचा आरोपही आहे. स्थानिक माध्यमांशी बोलताना तुकोगंज पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे, की फारुकीनं या शोमध्ये धार्मिक भावना दुखावल्याचा कुठलाही व्हीडिओ तेव्हा देण्यात आला नव्हता. तर गौर यांचा दावा आहे, की त्यांनी मुनव्वरला जोकची रिहर्सल करताना ऐकलं होतं.

मध्य प्रदेशच्या हाय कोर्टात काय झालं?
25 जानेवारीला मुनव्वरच्या जामिन अर्जावर सुनावणी करताना मध्य प्रदेश उच्च न्यायालयात रोहित आर्या यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने टिप्पणी केली. अन्य धर्मीयांच्या भावना दुखावल्या जातील असं वक्तव्य तुम्ही का करता? तुमच्या मनोवृत्तीला काय झालं आहे? तुमचं काम चालावं म्हणून म्हणून तुम्ही असं वागता का? असा सवाल न्यायालयाने केला.

मुनव्वर यांना जामिनाचा अर्ज मागे घ्यायचा आहे का? असंही न्यायाधीशांनी विचारलं. मात्र मुनव्वरने कोणताही गुन्हा केलेला नाही असं त्याच्या वकिलांनी सांगितलं. मुनव्वर यांनी तीन वेगवेगळ्या प्रसंगी हिंदू देवदेवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. मुनव्वर यांच्यामुळे अन्य कॉमेडियन्सनी अशाच स्वरुपाचे विनोद सांगितले असं सांगत जामीन अर्ज फेटाळण्यात यावा असं तक्रारदाराच्या वकिलांनी सांगितलं. यावर भाष्य करताना रोहित आर्या म्हणाले की अशा मनोवृत्तीच्या लोकांना मोकळं सोडता कामा नये.

कॉमेडियन्सच्या प्रतिक्रिया
मुनव्वरच्या अटकेविषयी बोलताना यूट्यूबर आणि कॉमेडियन सुशांत घाडगे सांगतो, “कलेच्या माध्यमातून आपण समाजातल्या गोष्टींबद्दल बोलत असतो आणि बोललंही पाहिजे. म्हणूनच त्याला स्टँड अप म्हणतात – ते फक्त उभं राहून बोलणं नाही, तर काही गोष्टींवर स्टँड घेणं – भूमिका घेणंही आहे. तो आवाज काढून घेण्याचा प्रयत्नही नेहमी केला जातो.

“जी कुणी मुलं स्टँड अप करतायत, ती सामान्य कुटुंबातली साधी मुलं आहेत. ती आता कलेच्या क्षेत्रात उतरली आहेत आणि त्यांचा आवाज मांडत आहेत. तो आवाज दडपण्याचा हा प्रकार आहे. जोक्सना इतकं महत्तव देण्याची गरज नाही की त्यासाठी एखाद्याला महिनाभर तुरुंगात राहावं लागेल.”

कॉमेडियन वीर दास ट्विटरवर लिहितात, “तुम्ही जोक्स आणि हास्य थांबवू शकणार नाही. कॉमेडियन्स ते सादर करतायत म्हणून नाही, तर हसणं ही लोकांची गरज आहे. तुम्ही जितका प्रयत्न कराल, तेवढं हसं करून घ्याल, आत्ताही आणि पुढे इतिहासाकडूनही. ज्यानं ज्यानं विनोदावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्याभोवती विनोदांची मालिका तयार झाली आहे.” कुणी नरेंद्र मोदींच्या एका जुन्या ट्वीटची आठवण करून दिली, ज्यात भारताचे पंतप्रधान उपहास आणि विनोद आपल्या आयुष्यात आनंद आणत असल्याचं म्हटलं आहे.

अभिनेत्री कुब्रा सैत, कॉमेडियन वरूण ग्रोव्हर, आदिती मित्तल आणि समय रैना यांनीही सोशल मीडियावरून मुनावरच्या अटकेवर टीका केली होती.कुणाल कामरा ते मुनव्वर फारुकी अर्थात अशा कारवाईला किंवा टीकेला सामोरं जावं लागलेला मुनव्वर हा पहिलाच कॉमेडियन नाही.

गेल्या महिन्यातच भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं एका निकालानंतर कुणाल कामरा आणि कार्टुनिस्ट रचिता तनेजा यांनी केलेल्या टिप्पणीसाठी त्यांच्यावर कोर्टाच्या अवमाननाप्रकरणी कारवाई सुरू केली होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये कॉमेडियन अग्रिमा जोशुआनं महाराष्ट्र सरकारच्या शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या प्रकल्पावर टिप्पणी केली होती, त्यानंतर अग्रिमाला सोशल मीडियावर बलात्काराच्या धमक्या मिळाल्या आणि शिविगाळही झाली. अग्रिमानं त्यानंतर माफी मागितली आणि संबंधित व्हीडिओ डीलिट केल्याचं जाहीर केलं होतं.

वारंवार होणाऱ्या अशा घटनांविषयी कॉमेडियन्सना काय वाटतं? सुशांत घाडगे सांगतो, “कशावर जोक्स करायचे याचं स्वातंत्र्य लोकांना असायला हवं. कलाकारांनी काही गोष्टींचं भान ठेवायला हवं हे खरं, पण कलाकारांचा कधी दुखावण्याचा हेतू नसतो, हेही लक्षात घ्यायला हवं.”आपण जोक्स फारच जास्त गांभीर्यानं घेतो, प्रत्यक्ष आयुष्यात गंभीर नसलेल्या लोकांवरही सोशल मीडियामुळे दडपण येतं की या जोकवर काहीतरी भूमिका घ्यायला हवी. प्रत्येकवेळी त्यातून काही उपदेश घेण्याचा किंवा त्यातून काहीतरी पोहोचतंय का असा विचार करतो का करतो? जोक जोक आहे, त्यावर हसायचं. लोकांनी हसणं बंद केलं तर कसं चालेल?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »